हे शब्द ऐकायला खूप विचित्र वाटतात. दोन एका मेकाशी न जुडणारे शब्द, पण जर त्यांचा अर्थ काढायला सुरुवात केली. तर एकाहूनही अधिक अर्थ बाहेर पडू लागतात. काळ गुलाब फक्त एवढ्या शब्दावर याच्या खूप सारी पुस्तके लिहिली गेली आहेत. प्रत्येकाला याचा अर्थ समजतो आणि एकदम मनाला ही लागून जातो, दुःख, वेदना, धोका., या गोष्टींत गुंतणे खूप सोपे आहे.
याबाबतीत विष्णुपंत रावांनी, अनवधानाने का होईना, आपल्या नातवाला एक चांगली शिकवण दिली, “तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणी इथे रिकामे बसलेले नाही.” शब्द भलेही कठोर होते, पण ते कुठेतरी श्रीजीतच्या छोट्याशा मनात बसले. याचा परिणाम झाला, म्हणजे हे नहीं कि श्रीजीत ला सर्व समजल.
प्रभाव किती पडला कोणालाच माहीत नाही, कारण त्याच्या आयुष्यात निर्मला होती त्याची आत्या, ती खूपदा न मागताच त्याला हवी असलेली गोष्ट देत असे, कधी कधी घरच्यांच्या नजरेआडूनही. आणि नेहमी सांगायची, “त्यांच्या मनाने ऐकू नको. त्यांना वाटते की तू हे सहन करू शकत म्हणून तुला ते बोलतात.”
आईचे सुख न मिळालेल्या श्रीजीतसाठी जे काही होते, ते त्याची आत्या होती. तो तिच्या मागेमागे नुसता फिरत असे.
श्रीजीत ला भलेही सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या, पण त्याच्या गोष्टी नेहमी चालू राहायच्या, त्याचे प्रश्न आत्याचे उत्तर, नाही मिळाले तरी ही काही ना काही तरी तो बोलायचाच. आणि त्याची आत्या त्याला सांगायची ही.
आपण नेहमी प्रत्येक गोष्टीला खूप खोल करून टाकतो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने समजू शकतो.
“मुक्या जनावरां बरोबर माणसासारखा व्यवहार करणे” हा विचारच बघून घ्या, ही गोष्ट लहान मुलांना ही समजते, त्यांनी कोणत पुस्तक, वगैरे वाचल नाही, जसे थोर माणसं म्हणतात तसं त्यांना समजते. ही गोष्ट सरळ सोपी ही आहे आणि थोडी किचकट आणि कठीण सुद्धा.
अशेच धडे, शिकवण आणि अभ्यास श्रीजीतचा त्याची आत्या घेत होती, सोबत चहा ही बनवत होती.
लग्नानंतरही ती आपल्या नवऱ्यासोबत माहेरीच राहत होती.
घर खूप मोठ होत, जुना वाडा. घरातील पुरुष कामावरून आले होते. तिचे वडील आणि लहान भाऊ अंगणात बसून गप्पा मारत होते. मोठा भाऊ आंघोळीला गेला होता.
निर्मला चहा तयार करत असताना छोटा श्रीजीत आपल्या एका लहानशा हाताने तिच्या साडीचा पदर घट्ट धरून अर्धवट उभा होता. आत्या हसली.
“कुठेही जाणार नाही मी. बरोबर बस आणि लिही.”
श्रीजीतने नकारार्थी मान हलवली.
निर्मलाने खाली वाकून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच विचारले, “आप्पाची भीती वाटते?”
आजोबांचा उल्लेख होताच चिमुकल्या श्रीजीतचा गळा कोरडा पडला. त्याची मान खाली झाली.
“बरं मी एवढा चहा नेऊन देते तू इथेच थांब.” अशी म्हणत ती स्वयंपाक खोलीच्या बाहेर निघाली. तिचा पदर अजून ही श्रीजीत ने सोडला नाही. श्रीजीत आपली स्वतःची बडबड चालू ठेवत तिच्या सोबत निघाला.
निर्मलाच्या अचानक लक्षात आले, तिने हात खाली करे पर्यंत
“आ~~~~त्त्यया या~~~” निर्मला पडता पडता राहिली पण श्रीजीत जमिनीवर पडून होता, त्याच्या काकाने जोरात आणखी एक लात श्रीजीतला लावून दिली. निर्मलाचा आत्मा तिलमिळला, ती जोराने ओरडली, पण तिचा आवाज तिच्या भावाच्या ओरड्या पुढे टिकला नाही.
“किती वेळा म्हटल? चूप राहत जा,..चूप रहात जा,..” श्रीजीत रडत होता की भीतीने कापकपत होता सांगणे कठीण होता, डोळ्यात आसू पण शरीर एकदम बधिर.. निर्मलाला हे पाहवल्या जात नव्हत. निर्मला जशी श्रीजीत जवळ गेली.
“हिनेच माजवल या हरामखोराले. राहू देल घरच्यासारखा राहू रायला भाडखाऊ” विष्णुपंत म्हणाला.
“हिनेच माजवल या हरामखोराले. राहू देल घरच्यासारखा राहू रायला भाडखाऊ” विष्णुपंत म्हणाला.
जिकडे तिकडे अंधार होता, काळाकुट्ट अंधारात बारीक दिव्याचा उजेड वाड्यातून येत होता. शांतता तिथे काळोखापेक्षा दाट होती.
“श्री.” निर्मलाने समोर मान खाली करुन उभ्या श्रीजीतला हाक दिली.
श्रीजीत तसाच उभा राहिला, त्याचे ते टिमटिमनारे डोळे काळे भोर झाले होते. निर्मलाच मन एकदम व्याकुळ होत, तिने स्वतःचा रडू कसातरी आवरला, कारण तिला श्रीजीतला सावरायचं होत.
श्रीजीत सोबत झालेला हा व्यवहार नवीन नव्हता, कित्येक वेळा तिने श्रीजीतच्या जखमांना मलम लावला होता. श्रीजीतचे असणे ही घरातील लोकांना पटत नव्हते, पण तो या घरातीलच रक्त होता आणि वरून त्याला निर्मलाच्या हट्टाने त्याला इथे जागा भेटली होती. कोणालाही तो इथे हवा नव्हता, त्याची कुजबुज ही सगळ्यांच्या कानाला त्रास देत होती.त्याला जोराने रडण्याचा ही अधिकार नव्हता, ना हसण्याचा. हे त्याचा सोबत का होतय त्याला एवढी समज नव्हती हे समजून घेण्याची.
Marathi Sex Story | Marathi Sex Stories | Marathi Sex Katha | Sex Stories Marathi | Sex Stories In Marathi | Marathi Hot Katha
“बाळा, जेवण करत का? आपण सोबत करू चल.. शेंगोळे केले मी तुला आवडतात ना?” यावर श्रीजीत काहीच बोलला नाही.
श्रीजीतने श्वास आवरत एक मोठा घोट घेतला. आणि फूस फूस करत “माझे फ् ~~आई व् बाबा कुठ आहे?”
निर्मला एकदम सुन्न झाली, तिचा गळा पूर्ण पाने भरून आला, अश्रू डोळ्यात कसे बसे कोंडून तिला शब्द सापडेना. तीच उर दुःखाने इतक भरून आलं की श्रीजीतला तिने घट्ट मिठीत ओढले.
दिवस तसेच चालत गेले, वर्ष आणि वर्ष उलटले, श्रीजीत आपला जास्तीत जास्त वेळ शाळा आणि कामात घालायचा, तो रिकामा दिसला की विष्णू पंतांच्या मस्तकात आग जात होती. म्हणून निर्मला, तिचा मोठा भाऊ रमेश याच्या मागे लागली की काही ही करून श्रीजीतला स्वतः सोबत घेऊन जातजा, तिचा लहान भाऊ रमेश तर पूर्णतः तिच्या वडिलाप्रमाणेच होता.
“बाबा काय म्हणतील, तुला कल्पना आहे का थोडी?” रमेश म्हणाला.
“हो, म्हणूनच मी म्हणत आहे, कारण तो घरी रिकामा दिसला तर त्याचे हाल काय होतील हे सर्वांना माहित आहे.” रमेश यावर पुढे शांत झाला.
“दादा, तुला काय मला वाटते त्याने काम कराव या वयात, मी तुमच्या सारखी निर्दयी नाही.” निर्मलाच्या मनात राग होता, ती खूप काही बोलणार होती पण ती चूप राहिली.
“बरं ठीक आहे, श्रीजीतला आपल्या नदी वाल्या वाड्यात नेत जाईन, पण माझ्याकडून ही अपेक्षा करू नको की मी त्याला नरम वागणूक देईल.” रमेशने सांगितले.
“बरं मी करते त्याला तयार तिथे जाण्या साठी.” निर्मला म्हणाली.
श्रीजित आता जास्त वेळ नदी जवळच्या वाड्यात घालवत होता, तो वाडा एक प्रकारे जंगलात होता, तिथे जनावर आणि पक्षी यांच्या किल्लोळ चालूच असायचा. तिथे काम खूप होती, त्याला एक सोबती काका ही होते त्यांना साफ सफाईत मदत करणे, तिथेच त्यांचा अनाजाचा गोदाम होता, त्याची पाहणी , माल उतरणाऱ्यात त्याच्याकडून होईल तेवढी मदत, पाणी भरणे श्रीजित स्वतःच्या वया पेक्षा जास्त काम करत होता, कारण त्याला ना मार खायचा होत, ना कोणाकडून कल्ला, आता त्याला स्वतः ही थोडी समज आली होती. पण त्याच्या मनात नेहमी प्रश्न फिरत होते.
एक दिवस सकाळीच शाळेत परीक्षा होती, सकाळीच उठून तो चालला गेला, निर्मलाने लपून आधीच्या रात्री त्याच्या साठी खायला करून ठेवलं होत. तो ते घेऊन शाळेत जाणारच होता की दरवाजात त्याचे आजोबा उभे होते.
“कुठे चालला?” आजोबाने विचारले.
श्रीजीतचा आवाजच समोर आजोबांना पाहून बसला, “मी ..मी शाळेत, शाळेत चाललो.”
“काय काम आहे? काही गरज नाही, आज सुरेश सोबत शहरात जा, समान धरू लागायला पाहिजे कोणीतरी.” सुरेश श्रीजीतचे लहाने काका, विष्णुपंतला तसाही श्रीजीत खूप भियायचा, कारण विष्णुपंतच्या मना विरोधात आमच्या गावातल तरी करण्याची हिंमत करत नव्हता.
श्रीजीतने पहिल्यांदा हिम्मत करून म्हटले.”नाही, आप्पा आज माझा पेपर आहे.”
“मी जा म्हटल ना, इथ कायले बोंबलत पेपर आहे न काय आहे. घरात राहू देऊ रायलो तर माजला का लय.” विष्णुपंतच बोलण श्रीजीतला समजलंच नाही, अस कसं कोणी बोलू शकते, त्याने फक्त मान त्याच्या आत्या कडे वळली जी दुरून साडीचा पदर घट्ट पकडून पाहत होती, तिने फक्त मान हलवली, आणि आजोबांच्या मनाने ऐकण्याचा इशारा केला.